Showing posts with label Media. Show all posts
Showing posts with label Media. Show all posts

Wednesday, January 4, 2012

सहभागाला कृतीची जोड हवी


२०११ हे वर्ष गाजले जगभरात सुरु झालेल्या विविध आंदोलनांमुळे.
१७ डिसेंबर २०१० या दिवशी २६ वर्षीय मोहम्मद बुआझीझी या ट्युनिशियन तरुणाने पोलिस व नोकरशाहीच्या जाचाला कंटाळून भरचौकात स्वत:ला पेटवून घेतले. या सामान्य विक्रेत्याला अनेक वर्ष इथल्या पोलिसांनी विविध प्रकारे त्रास दिला होता. राजधानीपासून साधारण २०० किलोमिटर दूर झालेल्या या घटनेचे पडसाद ट्युनिशियाभर पसरले. या तरूणाचा मृत्यु देशभर अनेक सरकार विरोधी निदर्शनांना कारणीभूत ठरला व दोनच महिन्यात तिथल्या २३ वर्ष सत्तेत असलेल्या अबिदीनीला पाणउतार व्हावे लागले. ट्युनिशियामधील ही घटना ईजिप्तमधील ताहीरीर चौकातील निदर्शनांना कारणीभूत ठरली. त्याचबरोबर माद्रीद, लंडन, तेल अव्हीव्ह, न्युयॉर्क, मॉस्को या शहरांमधल्या अनेक उठावांना ट्युनिशियामधील ही ठिणगी पुरेशी होती.
अमेरिका, ब्रिटन सारख्या विकसित देशांना आर्थिक मंदीच्या झळा बसत होत्या. ओबामांनी दाखवलेलं बदलाचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याची काहीच शक्यता दिसत नव्हती. आर्थिक भरभराटीच्या काळात हे देश आपल्या जनतेला आनंदी ठेऊ शकले होते. पण न संपणारी आर्थिक मंदी आणि त्याचा नोकर्‍यांवर होणारा परिणाम, यामुळे इथल्या तरुणांनाही या धुंदीतून बाहेर पडावे लागले. आपल्या अस्वस्थतेला सोशल नेटवर्कस्‍ वर वाचा फोडत त्यांनी आपल्याच सारख्या ९९% लोकांना शोधले. अमेरिकेच्या परिस्थितीला जबाबदार १% ना जाब विचारायला ते गेल्याच महिन्यात वॉल स्ट्रीटवर ठाण मांडून बसले. 
या सर्व विरोधकांमधे कमालीचे साधर्म्य होते. सगळीकडेच सुशिक्षित मध्यमवर्गीय तरूणांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा निदान दृष्य स्वरुपात पाठींबा नव्हता. सर्वच आंदोलकांचा ठाम विश्वास आहे की त्यांच्या देशातली राजकीय व आर्थिक व्यवस्था त्यांच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी असमर्थ आहे. या परिस्थितीला त्यांच्याकडे उत्तर नाही, पण काय हवे हे जरी माहीत नसले तरी काय नको हे मात्र पक्के माहित आहे. या सर्व विरोधकांनी समदु:खींना एकत्र करण्यासाठी नव्या माध्यमांचा वापर केला. जगभरातल्या अभ्यासकांकडून या तरूणांवर एकच टीका होते आहे, ती म्हणजे यांना कोणतीही वैचारिक धाटणी नाही व एकाही कृतीकार्यक्रमाची जोड नाही. परंतु या विरोधकांच्या मते अशी कोणतीही धाटणी नसणे हेच त्यांचे वैशिष्ठ्य आणि त्यांना  मिळणार्‍या प्रतिसादाचे कारण आहे.

भारतामधेही २०११ मधे अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आले. या सर्व भ्रष्टाचाराला उत्तर म्हणून गेली ४३ वर्षे संसदेत पडून असलेले लोकपाल विधेयक काही बदलांसकट मंजूर व्हावे म्हणून अण्णा हजारे यांनी उपोषण केले. या उपोषणामुळे व सरकार या विरोधाला उत्तर शोधण्यात कुचकामी ठरल्यामुळे बरेच लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात वेगवेगळ्या पध्दतीने सामील झाले. परंतु या आंदोलनात तरूणाई लोटली व त्यांच्या असंतोषाला वाचा फुटली हे माध्यमांनी वारंवार वापरलेले विधान मात्र फसवे वाटते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विरोधकांमधे तरूण जरी मोठ्या संख्येने असला तरी हा तरूण सर्व आर्थिक-सामाजिक स्तरांचे प्रतिनिधीत्व करणारा नक्कीच नव्हता. शहरी-सुशिक्षित-मध्यमवर्गीय तरुण, जो आधुनिक संपर्क साधनांपर्यंत पोहचू शकत होता तोच फक्त सहभागी होताना दिसला. ग्रामीण तरूण अगदी तुरळक प्रमाणात तर आदिवासी भागातील तरूणाचा सहभाग जवळजवळ शून्य होता. हा सहभागही शाश्वत कृती शिवाय फक्त सोशल नेटवर्किंगवर टीका टीपण्णी करणे अशा अतिशय मर्यादित स्वरुपाचा होता. कधीकधी मेणबत्ती किंवा एखाद्या धरण आंदोलनात नारे देणे ही जनसहभागाची प्रथम आणि द्वितीय पायरीच आहे. त्यामुळे आपण केवळ १% ते २% लोकांच्या प्रतिसादालाच सहभाग समजून त्याला जनसागर वगैरे म्हणण्याची घाई करत आहोत.  इतर आंदोलनांमधे व सार्वजनिक जीवनात कृतीशील असा तरूण मात्र काही काळानंतर यापासून दूर झाला ही बाब लक्षणीय वाटते.
लोकपाल विधेयकासाठीचे आंदोलन हे व्यवस्थेमधल्या बदलांसाठीचे आंदोलन आहे. अशा आंदोलनांना लोकाभिमुख बनविण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांमधून त्यामधे सहभाग हवा. असा सहभाग मिळविण्यासाठी आंदोलनाला कृतीची जोड हवी. भारतातल्या या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची रचना अशी कृती देण्यात असमर्थ ठरली. किंबहूना, हे आंदोलन सर्व समावेशक बनावे यासाठी रचनाच केली गेलीली दिसली नाही. यामुळेच खूप मोठ्या वर्गाला आपण आंदोलनात सहभागी व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे हे माहित नाही. त्याचा सहभाग प्रत्यक्ष कृतीला जोडून नाही, त्यामुळे त्या विषयाला तो बांधिल नाही. त्यामुळे काही प्रतिकात्मक कृतींनंतर हा तरूण जो याकडे काही उत्तरांची अपेक्षा ठेवत होता तोही यापासून दुरावला.   
जगभरात चालू असलेल्या आंदोलनांमधून नागरी प्रश्नावर काम करणार्‍या काही छोट्या कृतीगटांनी मात्र या आंदोलनातून प्रेरणा घेतली आहे. पण, त्यामधे सहभागी व्हायला शहरी तरुणांना वेळ मिळत नाहीये. एखाद्या संध्याकाळी मित्र-मैत्रिणी मिळून नारे देणं त्यांना जास्त सोईचं वाटतं. खरंतर जगभरात चाललेली ही लढाई याच चंगळवादी आणि बेफीकीर प्रवृत्तीच्या विरोधात आहे. म्हणूनच याच वृत्तीतून आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद हा फसवा व निष्फळ वाटतो.     
भ्रष्टाचाराची खरी झळ पोचलेला, नागरी सुविधांपासून वंचित असलेल्यांचा सहभाग या आंदोलनात फार कमी आहे. त्यामुळे यातून नवं नेतृत्व उभं राहून, याला योग्य दिशा देऊन एखादी शाश्वत कृती निर्माण होण्याची शक्यता फार कमी वाटते. यामूळेच सहभागाच्या पहिल्या दुसर्‍या पायरीवरचा तरूणही यातून तुटला जाईल याची भीती वाटते. याला उत्तर म्हणजे आपल्या भागात काम करत असलेल्या अशा छोट्या गटांना बळ देणं आणि जर कोणी काम करत नसेल तर असा गट उभा करणे हेच आहे. जर आपण या तरूणांच्या उत्साहाला कृतीची जोड देऊ शकलो तर यातून मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पण जर हि ठिणगी आपण अतिउत्साहाच्या भरात विझू दिली तर आपल्याला व्यवस्थेमधील बदलांसाठी आणखीनही मोठ्या घोटाळ्यांची वाट बघत बसावे लागेल.

Tuesday, June 21, 2011

वैचारिक साम्राज्यवाद


मी काल माझ्या एका सॉफ़्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मित्राशी बोलत असताना तो म्हणाला... मला बाबा मराठी वृत्तपत्रे-मासिके हातात घेववत नाहीत. मराठी अस्मिता वगैरे बाळगणारी मी त्याच्या या वक्तव्याने थोडी दुखावलेच, पण जर नीट विचार केला तर त्याच्या म्हणण्यामध्ये तथ्य नक्कीच आहे असं वाटलं. आज मराठी दैनिकांची/पाक्षिक/मासिकांची परिस्थिती, एखाद्‍ दुसरा अपवाद सोडल्यास, फार काही कौतुक करण्यासारखी नक्कीच नाही.

मराठीमध्ये दर्जेदार लेखन व्हावे यासाठी बरेच प्रयत्न सुरु आहेत, नाही असे नाही पण ते प्रयत्न बाळसे धरताना दिसत नाहीत. यात काही हौशी मंडळींनी एकत्र येऊन हाती घेतलेले प्रकल्पही बरेच आहेत. याला ’थिंक-मराठी’सारखे अपवाद देखील आहेत पण अशा संकेतस्थळांचा प्रचार होताना दिसत नाही.

या सगळ्या परिस्थितीला एक सोयीस्कर उत्तर मिळते ते म्हणजे “आज जवळ-जवळ सगळेच इंग्रजी शिकत आहेत, तर मराठीसाठी हा खटाटोप कशाला, काही नवे, ’चांगले’ वाचायचे झाले तर आंतरराष्ट्रीय मासिके आहेतच ना!” हो अगदी बरोबर – आज आपण तथाकथित सुशिक्षित मराठी लोकं तेच करत आहोत. वाचूया ना, उगाच मराठी-मराठी करत बसण्यापेक्षा इंग्रजीच वाचत राहू आणि आपल्या संत परंपरेबद्दल- वारकरी संप्रदायाबद्दल – शिवाजी महाराजांबद्दल नॅशनल जिऑग्राफिकने किंवा मोअर इंटेलिजंट लाईफने ’स्पेशल इश्यु’ काढला कि जोरात “जय महाराष्ट्र” म्हणून मोकळे होऊ.

इंग्रजी वाचायला, त्याचं कौतुक करायला माझा विरोध नाही पण आपण काय वाचतो, त्याने आपण कोणत्या अर्थव्यवस्थेला मदत करतो त्याचे भान आपल्याला असले पाहिजे असं मला वाटतं. आज आपण आपल्या नकळत एका नव्या प्रकारच्या वैचारिक-साम्राज्यवादाचे बळी बनत चाललो आहोत. हा प्रश्न फक्त तुम्हाला वाचायला काय आवडते एवढ्या पुरता मर्यादित राहीला नसून तो अनेक स्तरांवर आर्थिक-सांस्कृतिक-राजकीय आव्हाने निर्माण करणारा आहे.
मराठीमध्ये लेखकांची कमी नाही, परंतु आत्ता त्या लेखनाला पूरक अशी व्यवस्था आपल्याकडे नाही, ती कशी निर्माण होईल याचा आपण वाचक म्हणून विचार करायला हवा. कारण फक्त आहे त्या परिस्थितीत फक्त नाके मुरडून नावे ठेऊन, बदल काहीच होणार नाही.

Monday, August 17, 2009

POLITICAL IMAGE AND PERFORMANCE




The importance of image in contemporary political communication is, nonetheless, an occasion of much concern. It is often expressed that political style is now almost as important as political substance and that political success is dependent more on media management than that on policy wisdom. Political leaders and public figures conscious of their public image and performative powers, have always cultivated images for public consumption. Here we can take an example of Nehru with his peculiar red rose and image or Indira Gandhi throwing garlands in public those were given to her. The media image has a backdrop of constructed media image by the construction of ‘self’. It is essential that that individual is the by-product of his own intelligence and initiative.
The contemporary public life has expressed concerns about this constructed image of the politicians by the media. Also there is a growing tendency to construct the political events as major media events with its live coverage. It so much becomes an event that the concerned policy is squeezed out of the news and the constructed image prevails in the public mind. A politician may receive media coaching and construct a media image at odds with their everyday self, but more importantly the media image is the necessary feature for their communicative powers. This media image does not merely depend upon the superficialities of that person but it includes the personality and character of an individual and their ability to connect with the masses emotionally.

Tuesday, May 5, 2009

World Press Freedom Day


World Press Freedom Day is celebrated every year on 3rd May worldwide. It is an opportunity to celebrate the fundamental principles of press freedom; to evaluate press freedom, to defend the media from attacks on their independence and to pay tribute to journalists who have lost their lives in the line of duty.

The United Nations General Assembly proclaimed World Press Freedom Day in 1993, following a recommendation adopted at the twenty-sixth session of UNESCO’s General Conference in 1991.


As they investigate sensitive issues, unveil disturbing truths and question policies, journalists find themselves in the firing line of those directly or indirectly exposed by their reports.

Facing harassment, threats of violence and physical retaliation, journalists across the world continue to dig out troubling facts, challenge the status quo and expose those who commit crimes. Day after day, journalists investigate and file reports on issues they know they could be sued or killed for. Many pay the price. On World Press Freedom Day,
let us pay tribute to all those who have lost their lives for bringing us closer to the Truth.


Tuesday, December 23, 2008

Call Me Ted... Biography of Td Turner

"Early to bed, early to rise, work like hell and advertise!"

These words of fatherly advice helped shape Ted Turner's remarkable life, but they only begin to explain the colorful, energetic, and unique style that has made Ted into one of the most amazing personalities of our time. Along the way - among his numerous accomplishments - Ted became one of the richest men in the world, the largest land owner in the United States, revolutionized the television business with the creation of TBS and CNN, became a champion sailor and winner of the America's Cup, and took home a World Series championship trophy in 1995 as owner of the Atlanta Braves.

An innovative entrepreneur, outspoken nonconformist, and groundbreaking philanthropist, Ted Turner is truly a living legend, and now, for the first time, he reveals his personal story. From his difficult childhood to the successful launch of his media empire to the catastrophic AOL/Time Warner deal, Turner spares no details or feelings and takes the reader along on a wild and sometimes bumpy ride.

A must read for aspiring media people !!